CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
CRIME BORDER
मुख्य संपादक:राजेंद्र वखरे
भिवंडी (दिलशाद शेख ) : चिंचवली गावातील तरुणांनी कोरोना महामारीच्या काळात जलसंवर्धनाचा उपक्रम राबवत बारा एकर जागेत चिंचवली गावातील सर्व गावकरी एकत्र येवून श्रमदानातून तलावाची निर्मिती केली आहे, त्याने जंगल परिसरात निसर्ग संपदा वाढण्यास मदत होणार आहे. व त्या तलावाच्या सहाय्याने भाजीपाला लागवड करून गावकऱ्यांसाठी रोजगार निर्माण होतील.
तसेच वटपोर्णिमा या सणाच्या निमित्ताने तलावाच्या सभोवती वृक्षारोपण करुन वटपोर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशी माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थ जितेंद्र पाडेकर यांनी दिली, तसेच या अतिशय प्रेरणादायी उपक्रमामुळे चिंचवली गावातील नवतरुणांवर पुर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.