CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
भुसावळ :- वरणगांव, येथील सिध्देश्वर नगरमध्ये मावशीकडे आलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.चेतन डिंगबर माळी ( वय २४) रा . खकनार ता. जि. बऱ्हारपूर म. प्र. हा तरुण पुणे येथे खाजगी कंपनीत कामाला असून तो सध्या अक्षय तृतीयेपासून तो मावशीकडे आला होता.
मावस भावाने माहिती दिलेल्या माहितीनुसार घरातील सर्व मंडळी दि. ९ मे २०२३ रोजी नागेश्वर मंदिर येथे गुंजकर यांचे लग्न असल्याने मी आणि माझी आजी असे लग्नाला नागेश्वर मंदिर येथे गेले होते. माझा मावसभाऊ चेतन हा घरी होता. मी दुपारी १४.३० वाजता व माझी आजी लग्न समारंभ आटोपून घरी आलो. आजीने दरवाजा वाजवून दरवाजा उघडत नाही. चेतन यास झोप लागली असावी. म्हणून मी दरवाज्याला जोरात लाथ मारून उघडला तर मला मावसभाऊ चेतन डिंगबर माळी याने घराचे छताचे अँगलला दोरीने गळफास लावून लटकलेला दिसला. मी आरडाओरडा केला. तेव्हा शेजारील व्यक्ती धावतच आले. आम्ही चेतन यास ग्रामीण रुग्णालय वरणगांव येथे आणले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. पुढील पो. हे . कॉ. मनोहर पाटील करीत आहे.