CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
प्रतिनिधी : कु. प्राजक्ता नि. चौधरी
भुसावळ :- शहरातील शांतीनगर भागातील ज्ञानेश्वर गार्डनजवळ किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला करण्यात आला . दि . ८ जानेवारी रोजी रविवार रात्री ८ वाजेच्या सुमारास हि घटना घडली . या प्रकरणी शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला .फिर्यादी :- जय अनंत भिरूड ( वय १७ ) शांतीनगर रा . भुसावळ हे दोघे मित्र शांतीनगर ज्ञानेश्वर गार्डनजवळ फिरत असतांना यांच्यात काही कारणावरून वाद झाले . त्यात जय भिरूड यास धक्काबुक्की केली व चाकूने वार करून जखमी केली .:- चैतन्य रुपेश पाटील ( वय १८ ) जुना सातारा रा . भुसावळ याच्या विरुद्ध गु. रजि. नं . 006 / 2023 IPC ३२४ , ३२३, ५०६ ऍक्ट नुसार दि. ९ जानेवारी रोजी सोमवार सकाळी ८ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला .याप्रकरणी जय भिरूड याने दिलेल्या फिर्यादीवरून तपास शहर पोलीस ठाणे अमंलदार अब्दुल रजाक , रईस शेख हे तपास करीत आहे.