CRIME BORDER | 26 December | 11:44 AM
जालना:(क्राईम बाॅर्डर-प्रतिनिधी-अंकुश जोगदंड):जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या जानेफळ (दाभाडी) येथील अकरा रहिवासी कुटुंब हे अहमदनगर व पुणे जिल्ह्यात पाच सहा महिन्यांपूर्वी उस तोडणीच्या कामासाठी गेले होते. सदरील कुटुंब हे साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यावर दि. ३ मे २०२० रोजी आपल्या मुळ गावी परतल्यावर आरोग्य विभागाने त्यांना क्वारंटाईन करुन १४ दिवस गावापासून अंतरावर ठेवण्यास सांगितले .
गावच्या सरपंच श्रीमती.गयाबाई जोगदंडे यांनी आपल्या शेतात या सर्व कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करुन पन्नास किलो शिधा तसेच विहीरीवरती पाण्याची व्यवस्था करुन दिली.तसेच जानेफळ दाभाडी येथील रहिवासी व समाज सेवक सदाशिवराव मिसाळ (नाना) यांनीही तंदूळ व किराणा माल देऊन माणुसकी जपली.यावेळी सर्व कामगारांनी गावच्या सरपंच श्रीमती गयाबाई जोगदंडे व सदाशिवराव मिसाळ यांचे मनापासून आभार मानले