CRIME BORDER | 25 January 2026 | 12:26 PM
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी विजय कुमारची तीन मुले घरातच होती. ती एका कपाटात लपली होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. अटलांटा येथील भारतातील वाणिज्य दूतावासाने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जात आहे. दूतावासाने 'एक्स'वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही एका अत्यंत दुःखद गोळीबाराच्या घटनेमुळे खूप व्यथित झालो आहोत. ही घटना कौटुंबिक वादातून घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जात आहे.