CRIME BORDER | 30 January 2026 | 10:35 AM
ठाणे :- विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादन मोजणीकरिता उप अधीक्षक भूमी अभिलेख, भिवंडी कार्यालयामार्फत फेरचौकशी तारखा नेमण्यात आलेल्या आहेत. मोजणीच्या वेळेस शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या क्षेत्राची हद्द दाखवावी. शेतकरी उपस्थित न राहिल्यास मोजणी पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यानंतर संबंधित मोबदला दिवाणी न्यायालात जमा करावा लागेल, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे भूसंपादन मोजणी काम शासनाच्या प्राधान्यक्रमावरील असल्याने या प्रकरणी शेवटची संधी म्हणून वरील नमूद गावनिहाय फेरचौकशी दिवशी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचारी हे प्रत्यक्ष जागेवर फेरचौकशी करण्याकरिता येणार आहेत. या दिवशी सर्व हितसंबंधित अधिकार अभिलेख (7/12) धारक यांनी पुराव्याच्या सबळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहावे अन्यथा प्रचलित नियमावलीनुसार कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे भिवंडी उप अधीक्षक भूमी अभिलेख सचिन हमजादे यांनी कळविले आहे.