CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
दिवा :- आगरी समाजसह बहुजन समाजाचे नेते दीबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास जे विरोध करत आहेत ते रायगड, ठाणे, नवी मुंबई भागातील आगरी समाजाच्या सन्मानाला आणि अस्मितेला विरोध करत आहेत असे सांगत भाजपचे रोहिदास मुंडे यांनी दीबा पाटलांच्या नावाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
नवी मुंबई शहरात होणारे विमानतळ हे आगरी कोळी समाजाच्या त्यागावर उभे राहत आहे.नवी मुंबई शहर वसविण्यासाठी येथील भूमीपुत्रांनी त्याग केला आहे.दीबा पाटलांनी नवी मुंबई,येथील आगरी बहूजन समाज यासाठी मोठं योगदान आहे.आगरी समाजाची अस्मिता आणि ताठ मानेने उभं राहणाऱ्या समाजाचा अभिमान म्हणून दीबा पाटील हे समाजचे प्रतीक म्हणून उभे राहिले असताना,त्यांचे सामाजिक,राजकिय व सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड योगदान असताना त्यांच्या नावाला विरोध करणे म्हणजे आगरी समाजाच्या सन्मानाला विरोध करणे आहे असा घणाघात रोहिदास मुंडे यांनी सरकारी धोरणावर केला आहे.